मूल शहरात वारंवार होणारा अनियमित पाणीपुरवठा, नागरिकांना भेडसावणारी पाणीटंचाई आणि नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, मूल शहर* यांच्या वतीने “घागर मोर्चा” आयोजित करण्यात आला आहे.
हा मोर्चा बुधवार, दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता रामलीला भवन, मूल येथून सुरू होऊन *नगर परिषद कार्यालय, मूल येथे धडकणार आहे.
मूल शहरातील प्रत्येक नागरिकाला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, पाणी समस्येवर तात्काळ तोडगा निघावा आणि जनतेच्या मूलभूत हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टी, मूल शहर यांच्या वतीने सर्व नागरिक, माता-भगिनी, युवक आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा घागर मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.





